Karj Mukti Yojana : बँकेला आधार जोडले मिळाला कर्जमुक्ती योजनेचा ५० हजारांचा लाभ !

Karj Mukti Yojana: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणित झालेल्या 11 हजार 836 शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

ही एकूण रक्कम 46 कोटी 70 लाख रुपये असून सर्वाधिक 829 शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.2019 मध्ये, राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली.

अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्यात आले.यासाठी आधार लिंक बँक खाते अनिवार्य करण्यात आले होते.Karj Mukti Yojana

savings bank accounts
सेविंग खात्यासाठी आता बँकेचे नवीन नियम लागू savings bank accounts

पांढऱ्या कांद्याचे बियाणे करा उत्पादीत आणि मिळवा 4500 रूपये अनुदान !

मात्र, ऑगस्टअखेर ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार पडताळणी केली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर लाभ देता आला नाही. यासाठी राज्य सरकारने 12 ऑगस्ट ते 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती.

सर्वाधिक शेतकरी संख्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात ही मुदत संपल्यानंतर या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून 11 हजार 836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 46 कोटी 70 लाखांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 829 शेतकऱ्यांना 3 कोटी 52 लाख, जळगाव जिल्ह्यातील 729 शेतकऱ्यांना 3 कोटी 7 लाख आणि नाशिक जिल्ह्यातील 713 शेतकऱ्यांना 3 कोटी 54 लाख रुपये देण्यात आले आहेत.Karj Mukti Yojana

investment of Rs 1000
१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000

आजपर्यंत 5310 कोटींचा फायदा- आधार प्रमाणीकरणापूर्वी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजना पोर्टलमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार पडताळणी करून योजनेचा लाभ मिळणार आहे.तावरे म्हणाले की, आतापर्यंत 50 हजार शेतकऱ्यांना एकूण 5 हजार 310 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा, पहा यादी

Leave a Comment