Ladki Bahini Yojana: पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहेत अशा प्रकारची नवीन माहिती नुकतीच पुढे येत आहे. त्याचबरोबर पडताळणीला सुरूवात झाल्याने काही अपात्र बहिणींची नावे वगळण्यास देखील सुरुवात झालेली आहेत.
पुणे: राज्यात महायुती सरकारने सुरू केलेली ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) ही योजना अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहेच. या योजनेच्या अंतर्गत लाखो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना 1,500 रुपये जमा केले जात आहेत. मात्र आता सरकारने या योजनेतील लाभर्थ्यांची पडताळणी सुरू केलेली असून अनेक महिलांमध्ये याबाबत धास्ती निर्माण झालेली आहे. या योजनेमध्ये आधी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहेत. त्याचबरोबर पडताळणीला सुरूवात झाल्याने काही अपात्र बहिणींची नावे वगळण्यास देखील सुरुवात झालेली आहे. (Ladki Bahin Yojana)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार आता पुन्हा एकदा घरोघरी जाऊन छाननी सुरू करण्यात आलेली आहेत. या पडताळणी अंतर्गत पहिल्या टप्प्यात या योजनेच्या लाभार्थी असलेल्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana)घरी चारचाकी असलेल्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. त्यानुसार अपात्र बहिणींची नावे तत्काळ वगळण्यासही सुरुवात झाली असून, पुण्यात चारचाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे 75 हजार 100 इतकी आहेत. आणि अशा चार चाकी असणाऱ्या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ पासून वगळण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती स्वतः आधी ती तटकरे तसेच मुख्यमंत्री यांनी देखील दिलेली आहे त्यामुळे अशा प्रकारच्या महिलांना स्वतःच लाभ सोडण्याचे आवाहन देखील करण्यात आलेल्या होते.
लाडकी बहीण योजना होणार बंद.!! आदित्य ठाकरेंनी सांगितली वेळ; चर्चांना आले उधाण
राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात आलेली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 लाभ दिला जातो. यामध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास 20 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर सरकारने पैसे जमा केलेले आहेत. त्यानंतर आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबीयांच्या नावावर 4 चाकी असल्यास त्यांना मिळणारा योजनेचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहेत.
थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळलं
या पडताळणीसाठी आणि घरोघरी जाऊन छाणनी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहेत. मात्र, थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळले आहेत. कारण, ज्या नावांची यादी प्रशासनाला राज्याकडून मिळाली आहेत. त्यांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे जवळपास निश्चित झाले आहेत. त्यामध्ये केवळ अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे कळवून खात्री करून घेतली जात आहेत. त्यामुळे आता किमान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आलेल्या यादीतील नावे अपात्र करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या पातळीवर सुरू केलेली आहे. त्याचबरोबर कारवाई होण्याच्या धास्तीने काही महिलांकडून स्वतःहून लाभ सोडल्याचा अर्ज महिला व बालकल्याण विभागाकडे केला जात आहेत.
अर्ज कुठे करता येणार ?
पुण्यातील लाभार्थी ‘लाडक्या बहिणीं’ना या योजनेचा लाभ सोडायचा असेन, तर त्यांनी लेखी अर्ज भरावा. अशी माहिती देण्यात आलेली आहे. तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्ह्याचे महिला व बालकल्याण अधिकारी किंवा जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करता येणार आहे. त्यानंतर त्या लाभार्थ्यांचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहेत.
योजनेचे पात्रता निकष काय ?
21-65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावेत.
त्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत.
लाभार्थी महिलांकडे चारचाकी वाहन नसणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसणे यांचा या योजनेच्या अटीत समावेश होत आहेत.