Maharashtra l शिवसेनेचे (शिंदे गट) नेते राहुल शेवाळे यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र मधील राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. शेवाळे यांनी 23 जुलैला मोठा राजकीय भूकंप होण्याचा दावा करत, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटलेले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानांनंतर शेवाळे यांनी हे वक्तव्य केल्याने, राज्यातील सत्तासमीकरण आणि राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल शेवाळे यांचा मोठा दावा :
महाराष्ट्रातील नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर; तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री येथे पहा
राहुल शेवाळे यांनी केलेल्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले असल्याचे पाहायला मिळत आहे. शेवाळे म्हणाले की, “23 जुलैला मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहेत. ठाकरे गट आणि काँग्रेसच्या 10-15 आमदारांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संपर्क साधलेला आहे.”
तसेच, त्यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करत म्हटलेले आहेत की, “आपल्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून हे नेते अशा बातम्या पसरवत आहे. दुसऱ्या पक्षाच्या स्थितीबद्दल बोलण्यापेक्षा, स्वतःच्या पक्षातील फुटीबाबत काळजी घ्या.” शेवाळे यांच्या या विधानामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.
अजित पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; पालकमंत्री पदही नाही, भाजपचंही टेंशन वाढलं
Maharashtra Politics l संजय राऊत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट :
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यापूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवलेली होती. त्यांनी म्हटले होते की, “उदय सामंत शिंदे गटातून वेगळे होऊ शकता, त्यांच्यासोबत 20 आमदार आहेत. फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच ही फूट पडण्याची शक्यता होती.”
राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधत म्हटलेले आहेत की, “मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे अडून बसलेले होते. त्यावेळी भाजपचा वेगळा प्लॅन तयार होता.” त्यांच्या या विधानाने सत्ताधारी गटाच्या अंतर्गत हालचालींवर नवे प्रश्न निर्माण झालेले आहे.
Ration Card | रेशन कार्ड वर आता मिळणार नाही गहू, E-KYC करण्याच्या तारखे मध्ये वाढ