Maharashtra Weather News: राज्यातील हवामानात होत आहेत सातत्याने बदल !

Maharashtra Weather News: महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये काही दिवस मुसळधार पाऊस पडतो. मात्र, परतीच्या प्रवासातही पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. एकीकडे उष्मा वाढत असताना दुसरीकडे पावसाने पुनरागमन केल्याने राज्यात त्रेधातिरपीटही उडत असल्याचे चित्र आहे.

येत्या २४ तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, मेघगर्जनेसह पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, या सगळ्यात उष्माघात मागे पडताना दिसणार नाही. गेल्या ४८ तासांपासून राज्यात पावसाच्या पुनरागमनासाठी पूरक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे आता अर्ध्याहून अधिक राज्यातून मान्सूनने माघार घेतल्याचे चित्र आहे.Maharashtra Weather News

savings bank accounts
सेविंग खात्यासाठी आता बँकेचे नवीन नियम लागू savings bank accounts

कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर परिसरात परतीच्या पावसाने हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. येथील तापमानात वाढ झाली असून, हवेतील आर्द्रता वाढल्याने अपेक्षेपेक्षा जास्त उष्णता जाणवत आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला असून सकाळच्या धुक्यासह रिमझिम पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवत आहे. मात्र, सूर्य माथ्यावर आला की, गारव्याचे उष्णतेत रुपांतर होऊन नागरिक घामाघूम होताना दिसत आहेत. ऑक्टोबर महिन्यात राज्यातही अशीच परिस्थिती दिसणार असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

Maharashtra Weather News

investment of Rs 1000
१००० रुपयांची गुंतवणूक मुलांना करोडपती बनवेल! जाणून घ्या सविस्तर माहिती investment of Rs 1000

Leave a Comment