: केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४ ) आज जमा करण्यात आलेला आहे. मात्र, गेल्या वेळेप्रमाणे आता राज्य सरकारचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहेत.
यासंदर्भात अजूनही राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केलेले आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या १९ व्या हप्त्यासाठी राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना १ हजार ९६७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहेत.
यात सर्वाधिक सुमारे 5.5 लाख शेतकरी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वितरित करून त्याचा राजकीय लाभ उठविण्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले होते.
घरकुल योजनेसाठी अर्ज सुरू असा करा अर्ज Gharkul scheme Online Apply
याचवेळी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा हप्तादेखील देण्यात आलेला आहे. त्यानंतर डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या चार महिन्यांसाठीचा पीएम किसान सन्मान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि. २४) वितरित होणार आहेत.
बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. राज्यातील मुख्य समारोह सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार असून, राज्यातील ९२ लाख ८८ हजार ८६४ शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहेत.
यासाठी १ हजार ९६७ कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे. मात्र, यावेळी राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण होणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहेत.